शुद्ध व अशुद्ध शब्द

                       नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा 
                                     भाषा 
                           शुद्ध व अशुद्ध शब्द

मराठी भाषेमध्ये लेखन करताना व्याकरणाचे जे नियम असतात; ते लक्षात घेऊन लेखन केले तरच ते शुद्धलेखन ठरते.आपण  नियम प्रथम अभ्यासूया.

◆ जेव्हा एकाच अक्षराचा शब्द असतो तेव्हा तो नेहमी दीर्घ लिहावा. तसेच शब्दाच्या शेवटी
उकार आल्यास किंवा वेलांटी आल्यास तो दीर्घ लिहावा, जसे एक अक्षरी शब्द- मी, तू जी, ती, धूड.

तसेच-गाडी, माडी, साडी, बयू, आणू, पशू इ. यामध्ये परंतु, आणि, तथापि हे शब्द अपवाद आहेत.

◆जेव्हा शब्दातील अक्षरांचा उच्चार नाकातून केला जातो, त्या अक्षरांवर अनुस्वार दिला जातो उदा :-  बंगला, चेंडू, उंच, संसार इ.

◆ जेव्हा शब्द अकारान्त असेल तेव्हा शेवटून दुसरे ( उपांत्य) अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.

उदा :- रूप,लसूण, मीठ, अरूण, तूप, खीर, भूक इ.

◆ जेव्हा शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यामागील इकार / उकार हस्व लिहावा. उदा :- गरिबी, वकिली, मैत्रिणी, माहिती इ.

◆'ऋ' हा स्वर आहे, त्याला जोडुन येणारे अक्षर जोडाक्षर नसते. उदा :- वृक्ष, कृपा, मृग, कृष्ण इ. यामध्ये वृ. कृ. गृ ही जोडाक्षरे नाहीत..

◆'क्ष' आणि 'ज्ञ' ही जोडाक्षरे आहेत. उदा :- ज्ञान क्षत्रिय, यज्ञ, पक्षी इ.

◆हळूहळू, मुळूमुळू अशा शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते. खाली काही शब्द दिले आहेत त्य अभ्यास केल्यास अशुद्ध शब्द व शुध्द शब्द नीट समजतील.

अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द

आणी -   आणि

सौरक्षण -  संरक्षण

परंतू - पंरतु

स्त्रि - स्त्री

आणी - आणि

संगित - संगीत

मि - मी

रवीकिरण - रविकिरण

हळुहळु - हळूहळू

तु - तू

टोपि - टोपी

बहीणी - बहिणी

तु - तू

हुकुम - हुकूम

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे